सुभाष टेकडी चा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न निकाली निघाला


सुभाष टेकडी, दहाचाळ, महात्मा फुले कॅालनी तसेच पंचशील, आम्रपाली नगर, साईबाबा नगर  हा विभाग कीत्येक वर्षांपासून पाण्यासाठी वंचित राहिलेला आहे.

या विभागात पाणी कधीच ठरावीक वेळेत येत नाही. रात्री अपरात्री मध्यरात्री कधीही येते. येथील नागरिक पाणी मिळवण्यासाठी सतत अंदोलन करीत आहेत.

या प्रश्नावर संविधान बहुउद्देशिय संस्था आणि पाणीवाले बाबा म्हणून परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे नेहमीच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाबरोबर संवाद साधत होते. पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर आमदार डॅा. बालाजी किणीकर यांना प्रत्यक्ष भेटून,  निवेदने देवून हा प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.

आज संविधान बहुऊद्देशिय संस्थे च्या वतीने संजय वाघमारे, भाई रोकडे वंचित चे दिवाकर खळे, शिवसेनेचे संदिप डोंगरे, मनसेचे प्रदिप गोडसे, उल्हासनगर महापालिका अधिकारी वर्गाला भेट देण्यास गेले. आणि कित्येक दिवसापासून पाण्यासाठी चाललेला लढा यशस्वी झाला.

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने पाण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असे पत्रकच संविधान बहुऊद्देशिय संस्थेच्या नावे संजय वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी नागरीकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

या लढ्यात सुभाष टेकडी परिसरातील विविध पक्ष संघटना तसेच. अॅड. प्रशांत चंदनशिवे, प्रा. सुरेश सोनवणे, सुरेश देशमुख, दहाचाळ रहिवासी संघटना आणि आमदार डॅा. बालाजी किणीकर यांचे मोलाचे योगदान ठरले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!