विधानसभा मतदानाचा टक्का वाढला, आता २३ नोव्हेंबर ला निकालाकडे लक्ष


विधानसभा निवडणूक २०२४ 

विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६५  टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. शेवटच्या काही तासांत मतदानाने जोर धरल्याच  चित्र  पाहायला मिळालं. त्यामुळे हे वाढीव मतदान कोणाच्या बाजूने झुकते आणि कोणाला धक्का देते हे  येणाऱ्या निकालात स्पष्ट दिसेल. 

विधानसभा निवडणूक २०२४ ,  संपूर्ण राज्यात सायंकाळी ६  वाजेपर्यंत सरासरी ६५  टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे

राज्यातील जिल्हा निहाय मतांची टक्केवारी पुढील प्रमाणे,

क्रमांक जिल्हा टक्केवारी
अहमदनगर ७१.७३
अकोला ६४.४५
अमरावती ६५.५७
औरंगाबाद ६८.८९
बीड ६७.७९
भंडारा ६९.४२
बुलढाणा ७०.३२
चंद्रपूर ७१.२७
धुळे ६४.७
१० गडचिरोली ७३.६८
११ गोंदिया ६९.५३
१२ हिंगोली ७१.१
१३ जळगाव ६४.४२
१४ जालना ७२.३
१५ कोल्हापूर ७६.२५
१६ लातूर ६६.९२
१७ मुंबई शहर ५२.०७
१८ मुंबई उपनगर ५५.७७
१९ नागपूर ६०.४९
२० नांदेड ६४.९२
२१ नंदुरबार ६९.१५
२२ नाशिक ६७.५७
२३ उस्मानाबाद ६४.२७
२४ पालघर ६५.९५
२५ परभणी ७०.३८
२६ पुणे ६१.०५
२७ रायगड ६७.२३
२८ रत्नागिरी ६४.५५
२९ सांगली ७१.८९
३० सातारा ७१.७१
३१ सिंधुदुर्ग ७२
३२ सोलापूर ६७.३६
३३ ठाणे ५६.०५
३४ वर्धा ६८.३
३५ वाशिम ६६.७७
३६ यवतमाळ ६९.०२

बहुतांश शहरी भागांमधील मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला.  

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात राष्ट्रवादीचे  हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी (एसपी)  समरजितसिंह घाटगे यांच्यात चुरशीची लढत झाली . त्याठिकाणी  सर्वाधिक ८२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं. 

दुपारच्या सत्रानंतर म्हणजे सायंकाळी  मतदानास जोर वाढलेला दिसला. संध्याकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान सर्वाधिक मतदान झालं.

मतदान प्रक्रिया कुठेही गालबोट न  लागता अतिशय योग्य प्रकारे शांततेत  पार पडली. 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!